Pages

Monday, 14 May 2018

साखरभात


  • तांदूळ जुने व बारीक घ्यावेत, भात मोकळा होतो. नव्या तांदळाचा साखरभात चिकट आणि पांचट होतो. 
  • भात करताना तांदूळ चांगले शिजवून घ्यावेत. कच्चा भात पाकात घातल्याबरोबर आक्रसतो. 
  • तांदूळ तुपात भाजल्याने भात मोकळा व खमंग होतो. 
  • साखरभात करताना नेहमी जेवढे तांदूळ तेवढीच साखर घ्यावी आणि साखरेच्या निम्मे पाणी घालून गोळीबंद पाक करावा. त्या पाकात भात घालावा. 
  • पाक पक्का झाल्याची खात्री करून मगच भात घालावा नाहीतर भात घातल्यावर पटकन आळून न येता पातळच राहतो. 
  • गॅस अगदी मंद ठेवावा. त्यामुळे शिते टणक होत नाहीत. 
  • साखर घालताना सोबत चमचाभर खवा थोडासा भाजून घालावा. साखरभात चविष्ट होतो. 
  • भातावर ब्रेडचा तुकडा ठेवल्यास साखरभात मोकळा होतो. 
  • शिजवताना लिंबाचा रस घालून चांगला हलवावा. साखरभात दिसतो तर छानच शिवाय चवही वेगळीच येते. 
  • भातात रंग घालायचा असेल तर लिंबू पिळू नये. त्यामुळे भात कडवट होण्याची शक्यता असते. 
  • साखरभात चांगला निवल्यावरच वाढावा. आधी करून ठेवलेला, मुरलेला साखरभात चविष्ट लागतो. 

नारळीभात 
  • तांदळाच्या बरोबरीने नारळाचा चव घेतल्यास नारळीभात चवदार होतो. 
  • भात झाला असे वाटले की गॅसवर जाड तवा ठेवावा व त्यावर भाताचे पातेले झाकून ठेवावे. तवा चांगला तापल्यावर गॅस बंद करावा. भात बराच वेळ गरम राहून मोकळा होतो. 
  • लवंगाची फोडणी करण्याऐवजी लवंगाची पूड करून भातात वापरल्यास त्याचा वास सर्व भातास सारखा लागतो. तसेच थोड्या लवंगाही पुरतात. 
  • आदल्या दिवशी करून ठेवून दुसऱ्या दिवशी वाढायचे वेळी कुकरमध्ये गरम करून घेतल्यास भात जास्त स्वादिष्ट लागतो.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?