पोळीच्या कणकेपेक्षा पुऱ्यांची कणीक घट्ट मळावी. पुऱ्या खुसखुशीत तर होतातच शिवाय चांगल्या फुगतातही. कणीक सैल झाली तर पुऱ्या फुगत नाहीत, चिवट होतात.
- कणकेत फक्त मीठ घालून गार पाण्याने मोहन न घालता भिजवले तर पुऱ्या जड होत नाहीत.
- कणीक मळताना मोहन थोडेसे जास्त घालावे आणि कणीक अगदी घट्ट मळावी पुऱ्या चिवट होत नाहीत.
- कणीक कोमट पाण्यात भिजवली आणि त्यात थोडीशी साखर घातली तर पुऱ्या चांगल्या फुगतात.
- कणीक मळताना त्यात मोहन घातले तरी पुऱ्या चांगल्या फुगतात. मोहन जास्त झाले तर मात्र पुऱ्या तेलकट होतात.
- कणकेत मोहन जास्त झाले तर थोडी कणीक व अर्धा चमचा बेसन घालावे, पुऱ्या तेलकट होत नाहीत.
- कणीक मळतानाच त्यात एक टेबलस्पून मैदा मिसळला असता पुऱ्या कुरकुरीत होतात.
- कणीक मळण्याआधी त्यात चमचाभर पिठीसाखर आणि थोडेसे कॉर्नफ्लोवर मिसळले तरी पुऱ्या कुरकुरीत होतात.
- कणीक भिजवताना थोडासा रवा तेलावर फुलवून घेऊन त्यात घातल्यास पुऱ्या खुसखुशीत होतात.
- कणकेत अर्धी वाटी रवा घालावा, पुऱ्या लवकर मऊ पडत नाहीत.

Nice tips....
ReplyDelete